HW News Marathi
राजकारण

‘सुराज्य यात्रा काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही ?’

जालना | विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत जालना येथील जाहीर सभेत भाषण केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ”मागील ४ वर्षे महाराष्ट्रात ‘कुराज्य’ असताना राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य यात्रा’ काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही ? नशीब यात्रेला ‘सुराज्य यात्रा’ असे नाव दिले, ‘राम राज्य यात्रा’म्हटले नाही. मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेलेच आहे. आता फडणवीस रामाचा अवतार असल्याचे जाहीर करून टाका. म्हणजे महाराष्ट्रात आपसूकच ‘राम राज्य’ अवतरेल,” असे खोचक विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

राज्य सरकारला चार वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने भाजपने २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत सुरू केलेल्या सुराज्य यात्रा काढली आहे हाच विषय विखे पाटील यांनी धरून सरकारच्या कारभारावर टीका केल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्षची यात्रा बुलेट ट्रेन एवढी वेगवान असेल कि कदाचित ती लोकांना दिसणार देखील नाही .यात्रेसाठी एका जिल्ह्यला एकदिवस पुरत नाही आणि भाजप एका दिवसात तीन-तीन जिल्हे फिरायला निघाली आहे. सरकारचे कामही असेच त्यांच्या अदृश्य यात्रेसारखे असेल. अशी पतिक्रिया विखे पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“महाविकास आघाडी सरकार OBC आरक्षणाबाबत गंभीर नव्हते,” देवेंद्र फडणवीसांची टीका

Aprna

योगी आदित्यनाथसह मायावती यांच्यावर प्रचारबंदी, निवडणूक आयोगाचा दणका

News Desk

भाषण करून न दिल्यामुळे वसंत मोरे पुन्हा नाराज?

Aprna
राजकारण

राहुल गांधींवर मानहानीचा दावा

Gauri Tilekar

भोपाळ | मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वत्र जोरदार प्रसार सुरु आहे. त्यामुळे सर्वच पक्षच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप करीत आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीनी ही आक्रमकपणे प्रचार कार्याला सुरुवात केली आहे. प्रचारा दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका करण्याच्या नादात शिवराज सिंह चौहान यांच्या मुलावर राहुल गांधीनी पनामा पेपर्स प्रकरणी आरोप लावला आहे. राहुल गांधींच्या या टीकेमुळे शिवराज सिंह यांचे पुत्र कार्तिकेय याने राहुल गांधी विरोधात मानहानीचा दावा केला आहे.

कार्तिकेयचे नाव पनामा पेपर्सप्रकरणी जोडल्याने राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींना आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आपण कन्फ्युज झालो होतो त्यामुळे मी शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाव घेतले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. “मध्य प्रदेश आणि भाजपा शासित राज्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याने मी संभ्रमात असल्याने पनामा पेपर्स घोटाळ्यात शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाव घायचे नव्हते, तर छत्तीसगडह्या मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचे नाव घायचे होते. शिवराज सिंह यांचे नाव तर व्यापमं घोटाळ्यात होते, अशी सारवासारव राहुल गांधींनी केली आहे.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं घोटाळ्यात नाव होते तेव्हा पाकिस्तानसारख्या देशाने त्यांना तुरुंगात डांबले परंतु इथल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स घोटाळ्यात येऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. असे राहुल गांधी यांनी सोमवारी एका सभेत सांगितले. “जर कुणी कनिष्ठ नेत्याने असा आरोप केला असता तर गोष्ट वेगळी होती. पण खुद्द काँग्रेस अध्यक्षानीच अशाप्रकारचे आरोप लावणे दुर्भाग्य आहे असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

Related posts

लोकसभेबरोबरच ४ राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, जम्मू-काश्मीरवर सस्पेंस

News Desk

शिवसेनेकडून वनगांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर

swarit

पियुष गोयल यांना स्वतःचा फोटो पोस्टरवर आवडत नाही !

News Desk