HW News Marathi
राजकारण

‘शिवसेनेची अयोध्येत कितीशी ताकद आहे ?’

मुंबई | “शिवसेनेची अयोध्येत कितीशी ताकद आहे ? शिवसेना केवळ राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी शिवसेनेत तेवढी क्षमता नाही”, अशा शब्दात विहिंपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. अयोध्या राम मंदिराचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून पुन्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. याच्यावरून विश्व हिंदू परिषदेने शिवसेनेला सुनावले आहे.

अयोध्या राम मंदिर प्रकरणी न्यायालयाच्या निकालाची वाट बघण्यापेक्षा केंद्राने अध्यादेश काढावा, अशी मागणीही विहिंपने केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आधी बाळासाहेबांचे स्मारक उभारून दाखवावे. त्यानंतर राम मंदिराचा मुद्दा हाती घ्यावा, असा खोचक सल्लाही विहिंपच्या नेत्यांनी दिला आहे. दरम्यान, सुरुवातीच्या काळात विरोध करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र नंतर शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. इतक्या वर्षांनंतर शिवसेनेला राम मंदिराचा मुद्दा एवढा जवळचा का वाटतो आहे ?, असाही प्रश्न विहिंपने उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत ?

News Desk

“क्रिकेटच्या ज्ञानामुळे राजकीय ज्ञान वाढले”- उदय सामंत

News Desk

‘कबरची खबर’ शेवटी ‘राज’ उलघडलेच…! राज ठाकरें यांचा भाजपाध्यक्ष अमित शहांवर निशाणा

Adil
राजकारण

अयोध्या राम मंदिराच्या सुनावणीची तारीख जानेवारीतच निश्चित होणार !

News Desk

नवी दिल्ली । अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी तातडीने होणे गरजेचे आहे, असे महासभेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. मात्र त्यांची मागणी न्यायालयाने अमान्य केली आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीतच निश्चित करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते .

यानंतर या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यात यावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. परंतू ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे.अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी करणारी याचिका अखिल भारत हिंदू महासभेने दाखल केली होती. या प्रकरणात आपण आधीच आदेश दिलेले आहेत, असे म्हणत न्यायालयाने महासभेची याचिका फेटाळून लावली.

याचिका फेटाळून लावल्यानंतर, हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रवर्णी यांनी न्यायालयाच्या निर्णयाला दुर्दैवी असे म्हटले आहे, त्यांनी मोदी सरकारला एक इशारा दिला आहे. आणि सांगितले की, “सरकारने लगेचच राम मंदिरवर संसदेत अध्यादेश काढले नाही तर, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विरोध होईल”.

 

Related posts

शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

News Desk

राहुल गांधींविरोधातील दुहेरी नागरिकत्वाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk

शिवसेना-भाजप युतीचा चर्चा अंतिम, लवकरच होणार घोषणा !

News Desk