HW News Marathi
राजकारण

“…भाजपचा वंश तरी कोणता?”, उद्धव ठाकरेंचा जे. पी. नड्डांना सवाल

मुंबई | “जर इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील. तर भाजपचा (BJP) वंश तरी कोणता आहे,” असे सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांना केला आहे. देशात भाजपसोबत (BJP) मुकाबला करण्यासाठी कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही,” असे वक्तव्य नड्डांनी  भाजपची16 जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी नड्डा काल (31 जुलै) हे पाटणा येथे केले होते.  ठाकरेंनी आज (1 ऑगस्ट) घेतलेल्य पत्रकार परिषदेतून नड्डांच्या वक्तव्याचा खरपूस समाजार घेतला असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीने केलेल्या कारवाईवरून त्यांनी भाजपवर निशाणा शाधाला आहे.

उद्धव ठाकरेंनी नड्डांच्या भाषणांचे वाचन करत त्यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्व लोकांना आता डोळे  आणि कान उघडून आपला देश कुठे चाललेला आहे. आणि आपला देश जिथे हे नेहू इच्छितात, तिथे नेहून देने तिथे आपण मदत करायची की नाही. हे देशातील सामान्य नागरिकांनी ठरविण्याची वेळ आलेली आहे. नड्डांनी बिहारमध्ये दिलेल्या भाषणाचे एक दोन मुद्देही आम्ही ई पेपरमधून काढले आहेत. मी ते तुम्हाला वाचून दाखवित आहे. या भाषणात जेपीनड्डा म्हणाले, लोक 20-30 वर्षात इतर पक्षात काम करून भाजपमध्ये येत आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हटले, म्हणजे येथे यांचे कर्तृत्व शून्य आहे. भाजपकडे आचार-विचार असे काही नाही. पुढे ठाकरेंनी नड्डांचे भाषण वाचवून दाखविले की, भाजपसोबत लढणारी किंवा लढणारा. आज कुठलाच राष्ट्रीय स्तरावर लढणारा नाही. आणि कोणताच विचार कुठल्याच पक्षाकडे नाही.नड्डांजे म्हणाले ते फार भयानक आहे. जे पक्ष संपले नाहीत, ते संपतील. आणि फक्त आपण टीकणार आहोत.

“नड्डांचे जे वक्तव्य आहे. हे देशाला छत्री किंवा हुकूमशाहीच्या दिशेने नेहणारे आहे. ओडीशात एक व्यक्तीचा पक्ष, तेलंगणा, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात शिवसेना जी संपण्याच्या मार्गावर आहे. यावर ठाकरे म्हणाले, हे भाजपने प्रयत्न करूनच बघावे, असे प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस बहिण-भावाचा पक्ष भाजपला वंशवादाविरोधात लढायचे आहे. पहिले भाजपचा वंश कुठून सुरू झाला. हा पण एक महत्वाचा मुद्दा झाला, कारण तेच लोक म्हणता की, आमच्या पक्षात इतर पक्षातून लोक आमच्या पक्षाता आले आहेत. जर इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील. तर भाजपचा वंश तरी कोणता आहे,” उद्धव ठाकरे म्हणाले.

जे. पी. नड्डा नेमके काय म्हणाले

“आमच्या पक्षाची विचारधारा ऐवढी मजबूत आहे की, दुसऱ्या पक्षात 20 वर्ष काम करणार लोक सुद्धा आमच्या पक्षात येत आहेत. आज भाजपसोबत राष्ट्रीय स्तरावर लढणारा पक्षच राहिला नाही. आम्ही वैचारिक विचारावर उभे आहोत. मी वारंवार लोकांना सांगतो, जर आपल्याकडे विचार नसते ना. तर आपण एवढी मोठी लढाई लढता आली नसती. सर्व संपले. आणि जे नाही झाले, ते नष्ट होती. राहणार तर फक्त भाजपच राहणार,” असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

देशात भाजपसोबत मुकाबला करण्यासाठी कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही! – जे. पी. नड्डा

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आरपीआयला सत्तेवर आणा !

News Desk

सुखबीर सिंग बादल यांना विचारांची बद्धकोष्ठता । नवज्योतसिंग सिद्धू

News Desk

वेदांता प्रकल्पावरुन सुधीर मुनगंटीवारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

Darrell Miranda