HW News Marathi
राजकारण

भारताची राजधानी वायू प्रदूषणाच्या विळख्यात

नवी दिल्ली | भारतात वायू प्रदूषणामुळे २०१६ मध्ये तब्बल १ लाख २५ हजार लहान मुले दगावली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालात जगातील एकूण पाच देशांची नावे आहेत. या पाच देशांमध्ये भारताचे देखील नाव आहे. भारतात प्रदुषणाचे प्रमाण अधिक आहे. मुख्यतः राजधानी दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतात विशेषतः स्वयंपाकघरात आणि घराबाहेर निर्माण होणारे वायूचा गंभीर परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालानुसार, दारिद्र्यरेषेखालील अणि मध्यमवर्गीय देशांमध्ये ५ वर्षांपेक्षा देखील कमी वय असलेल्या तब्बल ९८ टक्के मुलांना वायू प्रदूषणातून निर्माण झालेल्या हवेतील सूक्ष्म कणांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील वायू प्रदूषण, बाल आरोग्य आणि स्वच्छ हवा या मुद्द्यांच्या संदर्भांत एक अहवाल सादर केला होता.

जागतिक वायू प्रदूषणाबाबत ग्रीनपीसनेही एक अहवाल सादर केला आहे. ग्रीनपीस यांनी जारी केलेल्या अहवालात भारताच्या प्रदूषण पातळीचे खूपच भयानक असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने जागतिक आरोग्य संघटनेचा हा वायू प्रदूषणाबाबतचा अहवाल सादर झाल्यानंतर दिल्ली आणि देशातील इतर राजधानी क्षेत्रांत प्रदूषणांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हणत तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्राच्या सत्तांतरावर 21 ते 23 तारखेपर्यंत घटनापीठासमोर सुनावणीची शक्यता

Aprna

“सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का?”, मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

Aprna

पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल शरद पवार म्हणतात…!

News Desk
राजकारण

‘सुराज्य यात्रा काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही ?’

Gauri Tilekar

जालना | विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत जालना येथील जाहीर सभेत भाषण केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ”मागील ४ वर्षे महाराष्ट्रात ‘कुराज्य’ असताना राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य यात्रा’ काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही ? नशीब यात्रेला ‘सुराज्य यात्रा’ असे नाव दिले, ‘राम राज्य यात्रा’म्हटले नाही. मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेलेच आहे. आता फडणवीस रामाचा अवतार असल्याचे जाहीर करून टाका. म्हणजे महाराष्ट्रात आपसूकच ‘राम राज्य’ अवतरेल,” असे खोचक विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

राज्य सरकारला चार वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने भाजपने २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत सुरू केलेल्या सुराज्य यात्रा काढली आहे हाच विषय विखे पाटील यांनी धरून सरकारच्या कारभारावर टीका केल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्षची यात्रा बुलेट ट्रेन एवढी वेगवान असेल कि कदाचित ती लोकांना दिसणार देखील नाही .यात्रेसाठी एका जिल्ह्यला एकदिवस पुरत नाही आणि भाजप एका दिवसात तीन-तीन जिल्हे फिरायला निघाली आहे. सरकारचे कामही असेच त्यांच्या अदृश्य यात्रेसारखे असेल. अशी पतिक्रिया विखे पाटील यांनी केली आहे.

Related posts

२३ मेपर्यंत वाट पहा, तेव्हाच सत्यपरिस्थिती समोर येईल !

News Desk

फडणवीसांची तुलना थेट श्री रामाशी करून दिल्या भाजपच्या ‘या’ आमदाराने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Aprna

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आजी, माजी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

News Desk