HW News Marathi
राजकारण

राष्ट्रपतींनी स्वीकारला एम.जे.अकबरांचा राजीनामा

नवी दिल्ली| लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे वादात सापडलेल्या एम.जे. अकबर यांच्या समोरील समस्या अजून वाढत जाण्याची शक्यता असल्याने अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तब्बल १५ महिलांनी एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे वादग्रस्त परिस्थितीनंतर अकबर यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्यानंतर हा राजीनामा स्वीकारला आहे.अकबर हे मोदी सरकारमधील राजीनामा देणारे पहिलेच मंत्री ठरले आहेत.

अकबर यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठिवण्यात आला होता. राज्यघटनेतील परिच्छेद ७५च्या तरतुदीतील कलमानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधानच्या सल्ल्यानंतर केंद्रीयमंत्री एम.जे अकबर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

अकबर यांच्यावरील आरोपांमुळे पुढच्या महिन्याल मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकि मध्ये भाजपाला फटका बसू शकतो त्यामुळे भाजपा नेत्यांनी अकबर यांची खाजदारीपद काढावी अशी मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती !

News Desk

गृह मंत्रालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची एसपीजी सुरक्षा हटविली

News Desk

#KnowYourNeta | जाणून घ्या…नागपूर मतदारसंघाबाबत !

News Desk