HW News Marathi
राजकारण

राष्ट्रपतींनी स्वीकारला एम.जे.अकबरांचा राजीनामा

नवी दिल्ली| लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे वादात सापडलेल्या एम.जे. अकबर यांच्या समोरील समस्या अजून वाढत जाण्याची शक्यता असल्याने अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तब्बल १५ महिलांनी एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे वादग्रस्त परिस्थितीनंतर अकबर यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्यानंतर हा राजीनामा स्वीकारला आहे.अकबर हे मोदी सरकारमधील राजीनामा देणारे पहिलेच मंत्री ठरले आहेत.

अकबर यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठिवण्यात आला होता. राज्यघटनेतील परिच्छेद ७५च्या तरतुदीतील कलमानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधानच्या सल्ल्यानंतर केंद्रीयमंत्री एम.जे अकबर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

अकबर यांच्यावरील आरोपांमुळे पुढच्या महिन्याल मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकि मध्ये भाजपाला फटका बसू शकतो त्यामुळे भाजपा नेत्यांनी अकबर यांची खाजदारीपद काढावी अशी मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सांगली-जळगावमधील भाजपच्या विजयावर उद्धव ठाकरेंचे टिकास्त्र

News Desk

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी RSSचे मुख्यालय आणि दीक्षाभूमीला दिली भेट

Aprna

राफेल करारात चाराण्याचा देखील घोटाळा झालेला नाही !

News Desk
राजकारण

कोणताही पक्ष १०० टक्के सर्वोत्तम नाही | भागवत

News Desk

नागपूरदसऱ्याच्या निमित्ताने नागपुरमध्ये आरएसएस कडून शस्त्र पूजा तसेच संचलन करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अनेक विषयांना भागवतांनी हात घातल्याचे पहायला मिळाले. राम मंदिरसाठी कायदा करा असा हि प्रस्ताव त्यांनी मांडला. भागवत म्हणाले की,देशातील कोणताही पक्ष १००टक्के सर्वोत्तम नाही. परंतु जो बरा आहे त्यांना निवडा , राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या पक्षाचा विचार करा. असे बोलताना भागवत यांचा कल भाजपाकडे होता.

जनतेने १०० टक्के मतदान करायला पाहिजे. देशाचे नेतृत्व कोणी करावे प्रत्येकाने ठेवावे. ‘नोटा ‘चा उपयोग करू नये. त्यामुळे अपात्र उमेदवाराला त्याचा फायदा होतो, असे ही भागवत म्हणाले . पक्षीय आणि जाती- पातीच्या राजकारणापासून स्वयंम संघ नेहमीच लांब आहे. उमेदवाराची राष्ट्रीय प्रेम, राष्ट्र भक्ती, राष्ट्रीय एकात्मता पाहूनच उमेदवाराला मतदान करा ,भागवत यांनी सांगितले. सोशल मीडियावर प्रक्षोभकपणे पोस्ट टाकून देशविरोधी अभियान चालविण्याचे काम शहरी नक्षलवादी करत आहेत. राजकीय आंदोलनामध्ये असेच चेहरे आता घुसत आहेत,’भारत तेरे तुकडे होंगे’असे म्हणणारे अनेक जण यात येत आहेत,पूर्वी फक्त माओवादच शहरी होता,असे भागवत म्हणाले.

Related posts

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या ‘या’ तीन उमेदवारांमध्ये रस्सीखेच

Aprna

एक लाखाचे ‘ठिगळ’ कसे पुरणार?, वाढत्या बेरोजगारीवर ठाकरेंचा सरकारला सवाल

News Desk

#PulwamaAttack : देशात निर्माण झालेल्या एकतेला मतांमध्ये रूपांतरित करा !

News Desk