HW News Marathi
राजकारण

न्यायालयाच्या निर्णयानुसार किंवा कायद्याद्वारे राम मंदिर व्हावे !

नवी दिल्ली । राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसऱ्याला झालेल्या सभेमध्ये राम मंदिरासाठी कायदा तयार अशी मागणी केली होती.परंतु या मुद्द्यावर भाजपा नेत्यांनी मौन धारण केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार किंवा कायद्याद्वारे राम मंदिर व्हावे, अशी भाजपाची भूमिका आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयत्न करत आहेत. परंतु मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने न्यायालयीन निर्णय येण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सरकार न्यायालयीन निर्णयाची वाट पाहत आहे.संघप्रमुखांच्या मागणीवर भाजपाच्या कोअर समितीच्या बैठकीत विचार होणार आहे. सहा ज्येष्ठ सदस्यांची समावेश असलेल्या समितीची बैठक लवकरच होणार आहे. न्यायालयीन निर्णयाची वाट पाहावी, असा पक्षाचा दृष्टिकोन असला तरी सरसंघचालकांच्या सूचनेचाही योग्य सन्मान करण्यात येईल, असे एका नेत्याने सांगितले.

मोहन भागवत यांनी दसऱ्याच्या सभेमध्ये नेमके काय म्हटले

राम मंदिरसाठी कायदा करा असा ही प्रस्ताव त्यांनी मांडला. भागवत म्हणाले की,देशातील कोणताही पक्ष १०० टक्के सर्वोत्तम नाही. परंतु जो बरा आहे त्यांना निवडा ,राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या पक्षाचा विचार करा. असे बोलत असताना, भागवत यांचा कल भाजपाकडे होता. जनतेने १०० टक्के मतदान करायला पाहिजे. देशाचे नेतृत्व कोणी करावे प्रत्येकाने ठरवावे . ‘नोटा’चा उपयोग करू नये. त्यामुळे अपात्र उमेदवाराला त्याचा फायदा होतो, असे ही भागवत म्हणाले. पक्षीय आणि जाती-पातीच्या राजकारणापासून स्वयंम संघ नेहमीच लांब आहे. उमेदवाराची राष्ट्रीय प्रेम, राष्ट्र भक्ती, राष्ट्रीय एकात्मता पाहूनच उमेदवाराला मतदान करा, भागवत यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पश्चिम बंगालमधील आताची सरकारही एका व्यक्तीसाठी चालवली जाते !

News Desk

‘बा–चा–बा–ची’तून देशाला आणि जनतेला काय मिळेल?

News Desk

भाजप कडून बलात्का-यांची पाठराखण | राज ठाकरे

News Desk
राजकारण

राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे !

swarit

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अयोध्येवारीची घोषणा केली होती. त्यांनतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करून शिवसेनेला डिवचले. मात्र या पोस्टरला शिवसेनेनेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. मनसे विरोधात केलेल्या पोस्टरबाजीत टोल आंदोलनाला सेटिंगवाले टोल आंदोलन असा शब्द वापरण्यात आला आहे. “राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे आणि जगाला सल्ले देण्याचे यांचे धंदे,” असे म्हणत राज ठाकरेंवरच जोरदार टीका केली आहे. पाक कलाकरांच्या विरोधाच्या नावे खुलेआम सेटिंग करण्यात आल्याचेही या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का? महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का?, शेती मालाला हमी भाव मिळणार का?, महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का?, मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?, महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का? आणि खिशातले राजीनामे बाहेर पडणार का? असे प्रश्न मनसेने त्यांच्या पोस्टरमधून शिवसेनेला विचारले आहेत.

Related posts

संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन

News Desk

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या 24 वर्धापन दिनी रिपाइंतर्फे जाहीर अभिवादन सभा

News Desk

…अन् विखे-पाटलांनी विचारले कुठले बटण दाबू …?

News Desk