HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठा अॅनाकोंडा कोणी आहे का!

नवी दिल्ली | मोदींपेक्षा मोठा अॅनाकोंडा कोणी आहे का? नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय संस्थांना गिळंकृत करणारे अॅनाकोंडा आहेत, असा आरोप आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलुगू देशम पार्टीचे (टीडीपी) नेते आणि अर्थमंत्री यनामाला रामकृष्नुदु यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. मोदींचीतुलना ‘अॅनाकोंडा’शी केल्यामुळे यनामाला यांच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे.

यनामाला पुढे असे देखील म्हणाले की, देशाला भाजपपासून वाचवणे हे आमच्या पार्टीचे कर्तव्य आहे. देश, लोकशाही आणि संवैधानिक मूल्ये जपण्याची प्राथमिक जबाबदारी आपली प्रत्येकाचीच बोले आहेत. तसेच यनामाला यांनी भाजपसह, वायएसआर काँग्रेस आणि जनसेनेवर टीका केली.

दरम्यान, यनामाला रामकृष्नुदु यांच्या विधानावर भाजपानेही सडेतोड उत्तर दिले आहे. एन चंद्राबाबू नायडू हे ‘भ्रष्टाचाराचे राजा’ आहेत. त्यांनी केलेला भ्रष्टाचार आता उघड होईल, असे भाजपाने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे”, उद्धव ठाकरेंची मागणी

Aprna

शरद पवारांच्या मध्यस्थीने अखेर उदयनराजे-शिवेंद्रराजेंचे मनोमिलन

News Desk

…और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं !

News Desk
राजकारण

वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे!

News Desk

मुंबई | वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून एका नरभक्षक (टी-१) वाघिणीला शुक्रवारी रात्री ठार करण्यात आले आहे. या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. या वाघिणीने आतापर्यंत तब्बल १४ जणांचा जीव घेतला असून गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र टी-१ वाघिणीच्या मृत्यूनंतर वन्यजीव प्रेमींनी वनविभागावर टीका केली आहे. ‘वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे‘ अशी टीका टी-१ वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून वन मंत्रालयावर केली आहे.

वाघिणीला मारण्याची न्यायालयाकडून परवानगी होती का? तिला बेशुद्ध करून पकडता आले नसते का? एक वन्यजीवप्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र आज अवनीला ठार केले. उद्या तिच्या बछड्यांचा किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल, असा असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली. वन विभागाने दिलेल्या या माहितीवर वन्यजीव प्रेमींनी संशय उपस्थित केला आहे.

 

 

 

Related posts

“परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात या”, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भावनिक साद

Manasi Devkar

पंतप्रधान मोदी उद्या सकाळपर्यंत करणार ध्यानधारणा

News Desk

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

Aprna