HW News Marathi
क्रीडा

आम्हाला बीसीसीआयने सदस्यत्व द्यावे, तेलंगना क्रिकेट असोसिएशनची मागणी

मुंबई : तेलंगना क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आम्हाला बीसीसीआयने सदस्यत्व द्यावे अशी मागणी केली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करुन असोसिएशनच्या पदाधिका-यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भातील निर्णय बीसीसीआयकडे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याची माहिती देखील यावेळी पत्रकारांशी बोलताना तेलंगना क्रिकेट असोसिएशन कडून देण्यात आली आहे. आंध्रप्रदेश मधून 2014 साली तेलंगनाची निर्मिती झाली. त्यानंतर तेलंगना वेगळे राज्य म्हणून अस्तित्वात आले. तेलंगनातील 30 जिल्ह्यात विविध वयोगटातील जवळपास 12 हजार मुले- मुली क्रिकेट खेळ खेळतात. अशी माहिती तेलंगना क्रिकेट असोसिएशन चे महासचिव धरम रेड्डी यांनी दिली.

रेड्डी पुढे म्हणाले की, हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन फक्त हैद्राबाद शहरात राहणा-या क्रिकेटर्स करीता आहे. तीन वर्षा पूर्वीच टीसीए ने बीसीसीआयला कळविले होते की, तेलंगना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूना राष्ट्रीयस्तरावर आपले कसब दाखविण्याची संधी द्यावी. टीसीएने आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सैय्यद आबिदअली यांच्या सहित समकक्ष खेळाडूना प्रशिक्षक म्हणून नवयुवक आणि युवतीना प्रशिक्षण दिलेले आहे.

तेलंगना सरकारने एल. बी. स्टेडियम आणि अन्य खेळांची मैदाने क्रिकेट खेळण्यास उपलब्ध करुन दिलेली आहेत. मागील तीन वर्षा पासून बीसीसीआयच्या नियमानुसार 14 हजार सामने खेळविण्यात आलेले आहेत. 29 लीग सामनेही खेळविण्यात आलेले आहेत. या पत्रकार परिषदेत टीसीएचे उपाध्यक्ष हरिनाथ रेड्डी, सहसचिव श्रीनिवास घारगे उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Asia Cup 2018 | विराट ऐवजी रोहित शर्मा करणार नेतृत्त्व

News Desk

महाराष्ट्र सरकारकडून नेमबाज राही सरनोबतला पगारच नाही

News Desk

उसेन बोल्टचे व्यावसायिक फुटबॉल विश्वात पदार्पण

News Desk
राजकारण

जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींचा राजीनामा

News Desk

श्रीनगर | भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तातडीने राजीनामा दिला आहे. मेहबुबा यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपुर्द केला असून सायंकाळी चार वाजता पीडीपीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पीडीपीचे प्रवक्ते रफी अहमद मीर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपसोबत मिळून आम्ही योग्य प्रकारे सरकार चालवण्याचा प्रयत्न केला. भाजप सत्तेतून बाहेर पडत आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे. याबाबत आम्हाला कोणतेही संकेत देण्यात आले नसल्याचे ते यावेळी बोलताना म्हणालेत.

Related posts

ज्यांनी ५ वर्षे राज्याचं गृहखाते सांभाळले त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही हे दुर्दैवच – हसन मुश्रीफ

swarit

शरद पवार हे जाणता राजा आहेत, यात चुक काय?” छगन भुजबळांचे वक्तव्य

Aprna

उपेंद्र कुशवाह यांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

News Desk