HW News Marathi
मुंबई

‘साई संस्थेचा’ प्लास्टिक बंदीला मोलाचा हातभार

मुंबई | प्लास्टिक बंदी होऊनही बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना सर्रास पहायला मिळत आहे. आपली सामाजिक बांधिलकी जपत ‘साई’ म्हणजेच सोशल ऍक्टिव्हीटीज इंटिग्रेशन या संस्थेने नुकतेच विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

संजना गजाकोश यांनी या मुलांना प्लास्टिक बंदीचे महत्त्व समजावून सांगत सोप्या पद्धतीने कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी साई संस्थेचे संस्थापक विनय वस्त, अरविंद पाटील, आनंदीता पेडामकर हेदेखील या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

“प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवायची असेल तर सुरुवात ही शालेय विद्यार्थ्यांपासुनच करायला हवी. कारण प्रत्येक नवी पिढी देशाचं भवितव्य ठरवते”. असे ’संजना गजाकोश’ म्हणाल्या.

“बदलत्या काळाचा वेग पकडत आपणही नवे बदल स्वीकारायला हवेत. हाच विचार आम्ही या वंचित घटकातील मुलांना देत असतो. जनजागृती करण्यासाठी ‘साई संस्था’ नेहमीच नवे उपक्रम राबवत असते. म्हणूनच यावर्षी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संतुलनाविषयी सजगता आणण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. समाजप्रबोधनासाठी यापुढेही अशाच नवनवीन उपक्रमात आम्ही सक्रीय राहू”. असे साई संस्थेचे संस्थापक विनय वस्त यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१ ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरु

Manasi Devkar

शेतकरी कर्जमाफीसाठी उत्तरप्रदेश मॉडेलचा अभ्यास – मुख्मयंत्री

News Desk

अनुपम खेर एफटीआयच्या प्रमुखपदी

News Desk
मुंबई

शिवाजी पार्कवर रंगला महाराष्ट्र दिनाचा दिमाखदार सोहळा

News Desk

मुंबई : सालाबादाप्रमाणे यंदाही दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रध्वजवंदन, संचलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते,औद्योगिकमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर उपस्थित होते आदि मान्यवर उपस्थित होते.

मंगळवार १ मे रोजी ५८ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दादर मधील शिवाजी पार्क मैदानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एस टी महामंडळातर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजने अंतर्गत शहिदांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहिदांच्या 5 वीर पत्नींना एसटी चा मोफत आजीवन पास देण्यात आला.

 

Related posts

कुर्ला स्थानकात पाणी साचले, मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने

News Desk

भारतात प्रथमच दहा शहरांत ई-स्पोर्ट स्पर्धा होणार

swarit

सायन पनवेल महामार्गावर पाण्याची पाईप लाईन फुटली

News Desk