HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या डॉ. मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी

मुंबई | विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक होणार आहे. ११ जागांपैकी ५ जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. तर शिवसेना २, काँग्रेस २ आणि राष्ट्रवादी एका जागेवर उमेदवार उभा करणार आहेत. काँग्रेसकडून शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा हे दोन उमेदवार निश्चित केले आहेत. तर तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील अर्ज भरण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेकडून अनिल परब आणि डॉ. मनीषा कायंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

डॉ. मनीषा कायंदे यांचा अल्प परिचय

डॉ. मनीषा कायंदे या शिवसेनेच्या प्रवक्त्या असून त्या प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्यामसुंदर कायंदे व सुशीला कायंदे यांच्या कन्या आहेत. परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. वटवाघूळाच्या प्रजनन ग्रंथीबाबत त्यांनी केलेल्या संशोधनासाठी मुंबई विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे. सुमारे ११ वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य म्हणून काम केल. तर त्यांनी डिस्ट्रिक्ट प्लानिंग ऐंड डेव्हलपमेंट कमिटीच्या सदस्य होत्या. महिला दक्षता समिती (मुंबई पोलीस)च्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केल आहे. काँग्रेस शासना विरोधात महिलांना आरक्षण, महागाई, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात त्यांनी आंदोलन केली. मुंबई रेल युजर्स consultative committee वर असताना महिला प्रवाशांसाठी बरीच कामे केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सेना-भाजपमध्ये युतीचा तिढा अखेर सुटला ?

News Desk

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार! – एकनाथ शिंदे

Aprna

बालभारतीच्या ८ वीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याऐवजी कुरबान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख 

News Desk
महाराष्ट्र

विघ्नहर्त्याला ही प्लास्टिक बंदीचे विघ्न

News Desk

मुंबई | राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिक बंदीचा फटका आता गणेश कार्यशाळामध्ये बनत असलेल्या गणेश मूर्तींना बसत आहे. गणेश उत्सव अगदी काही दिवसावर येवून ठेपला आहे. याच कालावधीत शासनाने प्लास्टिक बंदी घातल्याने याचा परिणाम गणेश मूर्ती घडविणाऱ्या कार्यशाळावर झाला आहे. गणेश मूर्ती झाल्यावर पावसाने भिजू नये म्हणून व खराब होऊ नये म्हणून प्लास्टिकने झाकली जाते. मात्र आता प्लास्टिक बंदी झाल्याने या गणेश मुर्त्या झाकायच्या कशा, ह्या विचारात गणेश मूर्तीकारांना पाडले आहेत.

शहरात शाडू मातीपासून मूर्ती बनविणाऱ्या अनेक कार्यशाळा आहेत. बाप्पाच्या काही मुर्त्या विदेशात देखील जात असल्याने या मूर्त्यांना प्लास्टीकचे आवरण घातले जाते. परिसरातील धूळ बसल्याने मुर्त्या खराब होत असल्याने प्लास्टिक घालून या मुर्त्यांचे रक्षण केले जाते. मात्र आता प्लास्टिक बंदी असल्याने कारवाई होण्याच्या भीतीने मुर्त्या न झाकता ठेवल्या असल्याने धुवाधार पावसात या मुर्त्यांवर परिणाम होत आहे. प्लास्टिकला अन्य पर्याय नसल्याने ह्या मुर्त्या जपण्यासाठी मूर्तीकारांना धडपड करावी लागत आहे. मुर्त्यांची बनावट नाजूक असल्याने या मुर्त्यांची पुन्हा सफाई करताना हानी पोहोचत आहे.

मूर्तीकारांना प्रथमच अशा वेगळ्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी शाडू मातीच्या किचकट मूर्तीचा प्रसार करणाऱ्या मुर्तीकाराना आता समस्येने ग्रासले असल्याने प्लास्टिक ऐवजी अन्य पर्याय मूर्तिकार शोधत आहे.

गेल्या ५५ वर्षापासून मुर्ती घडविणाऱ्या मुर्तीकार पांडुरंग राजाराम कदम यांच्याशी प्लास्टिक बंदीवर संवाद साधताना ते म्हटले की, पालिकेने प्लास्टिक बंदी करणे हा सरकारचा एक उत्तम निर्णय आहे. या निर्णयाचा आम्ही देखील स्वागत करत आहोत. परंतु प्लास्टिक बंदीचा सर्वात जास्त त्रास हा शाडूच्या मुर्तींना होतो. शाडूच्या मुर्तींना कलर आणि धूळ चिकटून राहते. त्यापासून रक्षण करण्यासाठी आम्ही मुर्तीकार प्लास्टिकच्या आवरणाने बाप्पाच्या मुर्ती झाकून ठेवतो. मात्र प्लास्टिकचे आवरणात मुर्ती नाही झाकले तर या मुर्तींवर ब्रश मारला तर ब्रशबरोबर कलर देखील निघतो. त्यामुळे यंदा मुर्तीकारांना त्याच्या बाप्पाच्या मुर्ती घडविण्यापेक्षा त्यांचे पावसापासून कशी सुरक्षा करावी याच चिंता आहे.

Related posts

कुपोषणावर मात करण्यासाठी ‘टिस’ या संस्थेची नियुक्ती करणार !

News Desk

“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”

Aprna

वाधवान कुटुंब महाबळेश्वरला कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने गेले, सीएम आणि गृहमंत्र्यांना फडवीसांचा सवाल

News Desk