HW News Marathi
राजकारण

आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडणार का ?

मुंबई | “फडणवीस मंत्रीमंडळातील अन्य मंत्र्यांची अशीच निःपक्षपाती चौकशी होणार का ? आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. लोकयुक्तांनी एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी असल्याचा अहवाल दिल्यानंतर जयंत पाटील यांनी हे सवाल उपस्थित केले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच प्रकाश मेहतांना क्लीन चिट दिली होती. मात्र, चौकशीमुळे सत्य समोर आले आहे. एसआरए घोटाळ्याच्या चौकशीची मागणी वारंवार विधानसभेत लावून धरली असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. अखेर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. या चौकशीनंतर आज (६ मे) हा घोटाळा उघडकीस आला असेही जयंत पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कमीत कमी बोला अन् बुधवारचे धक्के पचवून उभे रहा, शिवसेनेचा भाजपला सल्ला

News Desk

मुख्यमंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, काळजीचे कारण नाही !

News Desk

भाजप-शिवसेना युती मजबूत | उद्धव ठाकरे

News Desk