HW News Marathi
राजकारण

निकषांची वाट पाहण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करावा | अजित पवार

मुंबई | सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्यात १९७२ या वर्षीपेक्षाही भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे आता निकषांची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले, राज्यातील भारनियमन बंद करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. केंद्राच्या समितीकडे डोळे लावून वेळकाढूपणा करू नका. विशेष विमानानं पथकाला आणा. असा सल्लाही यावेळी असे अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

तसेच, पुढे धनंजय मुंडेनी बोलताना सरकारच्या धोरणावर टीका केली. जलयुक्त शिवारमुळे १७ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा पंतप्रधान मोदी यांचा दावा खोटा आहे, असे ते यावेळी म्हणाले आहेत. जलयुक्त शिवार योजना बोगस असल्याचे सिध्द झाले आहे. जीएसडीएचा अहवाल जलयुक्त फसल्याचे सिध्द होतेयं. साडेसात हजार कोटीचा हिशोब सरकारने जनतेला द्यायला हवा. सरकारने जनतेला फसवले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जनसंपर्क वाढविण्यासाठी शहांनी घेतली माधुरीची भेट

News Desk

जाणून घ्या… आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Aprna

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यावर भडकल्या ममता दीदी

News Desk
मनोरंजन

नागराज मंजुळे आता मुख्य भूमिकेत दिसणार

Gauri Tilekar

मुंबई | प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या लोकप्रिय चित्रपटांनंतर आता नागराज पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावायला येणार आहेत. काही दिवसांपूर्वी ‘नाळ’ असे शीर्षक असणाऱ्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टिझरमध्ये ‘आई मला खेळायला जायचेय’ या गाण्यातून आईकडे खेळायला जाण्याचा हट्ट करणाऱ्या अशा एका निरागस मुलाची कथा दिसत आहे. या टिझरनंतर आता चित्रपटाचे पाहिले गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या टिझरमध्ये असलेल्या निरागस मुलाच्या वडिलांची भूमिका खुद्द नागराज यांनी सरकारी आहे.

‘नाळ’ या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी निर्मिती क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. या चित्रपटाची निर्मिती नागराज मंजुळे यांनी तर दिग्दर्शन ‘सैराट’चे कॅमेरामॅन सुधाकर रेड्डी यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट १६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. ‘नाळ’ या चित्रपटानंतर नागराज मंजुळे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ‘नाळ’ या सिनेमाच्या टीजरला फार कमी वेळातच २ मिलियन पेक्षा जास्त व्हियूज मिळाले आहेत

Related posts

पर्रीकरांच्या निधनानंतर बॉलिवूडने केले दु:ख व्यक्त, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

शाहरूखची बहीण पाकिस्तानमधून लढवणार निवडणूक

News Desk

यंदाच्या दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या ही विशेष भेट

swarit