HW News Marathi
राजकारण

निकषांची वाट पाहण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करावा | अजित पवार

मुंबई | सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्यात १९७२ या वर्षीपेक्षाही भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे आता निकषांची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले, राज्यातील भारनियमन बंद करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. केंद्राच्या समितीकडे डोळे लावून वेळकाढूपणा करू नका. विशेष विमानानं पथकाला आणा. असा सल्लाही यावेळी असे अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

तसेच, पुढे धनंजय मुंडेनी बोलताना सरकारच्या धोरणावर टीका केली. जलयुक्त शिवारमुळे १७ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा पंतप्रधान मोदी यांचा दावा खोटा आहे, असे ते यावेळी म्हणाले आहेत. जलयुक्त शिवार योजना बोगस असल्याचे सिध्द झाले आहे. जीएसडीएचा अहवाल जलयुक्त फसल्याचे सिध्द होतेयं. साडेसात हजार कोटीचा हिशोब सरकारने जनतेला द्यायला हवा. सरकारने जनतेला फसवले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदींनी काय केले ?

News Desk

आता २०१९ संपूर्ण परिवर्तनाचे वर्ष ठरेल काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

News Desk

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

Aprna