HW News Marathi
Covid-19

कोणत्याच पक्षाला टोकाची भूमिका घ्यायची गरज नाहीय ! जयंत पाटील

मुंबई । “आगामी निवडणूकांमध्ये फार टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता कुठल्याच पक्षाला नाही”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (४ जून) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. कॉंग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटील याबाबत बोलताना म्हणाले की, “काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर आज आम्हाला कोणतेही भाष्य करायचे नाही. निवडणुकीच्यावेळी काय परिस्थिती असते त्यावेळी त्याचे अवलोकन करून त्याबाबतीत बोलणे अधिक उचित ठरेल.” तसेच, “आम्ही आघाडी सरकारमध्ये आहोत त्यामुळे आम्हाला आमचे दोन्ही मित्रपक्षांना सोबत घेऊन सर्व ठिकाणी जाण्याची इच्छा आहे. पण एखाद्या जिल्हयात वेगळा विषय असेल तर संबंधित दोन्ही पक्षांशी चर्चा करुन त्यात योग्य तो निर्णय करु”, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार व मुख्यमंत्री कार्यालयात केवळ वेळेचा अभाव !

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अनलॉकच्या घोषणेवरून झालेल्या घोळाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “विजय वडेट्टीवार व मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात केवळ वेळेचा अभाव झाला आहे. समन्वयाचा अभाव आहे असे नाही आणि त्यातील मला अधिक माहिती नाही. वडेट्टीवार यांना अडव्हॉन्स माहिती कुणी दिली होती का? ते पाहिलं पाहिजे. पण लॉकडाऊनचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय घेते. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णांची वाढती संख्या, भविष्यात येणारी आव्हाने आणि त्या – त्या जिल्हयातील पॉझिटिव्हिटीचे प्रमाण या सगळ्याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय मुख्यमंत्री कार्यालय घेईल”, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणावर तिन्ही पक्ष एकाच भूमिकेत !

“मराठा आरक्षणावर तिन्ही पक्ष एकाच भूमिकेत आहेत. कुणाचीही वेगवेगळी भूमिका नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यामध्ये दुमतही नाही”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. तसेच “मराठा आरक्षणाबाबत सर्व काम ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर आवश्यक व योग्य ते विधान अशोक चव्हाणच करतील”, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. “संसदेचं नेतृत्व करणाऱ्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी विचार केला पाहिजे व वेळ दिला पाहिजे”, असेही मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जबादारी झटकू नका, मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत करा!” शिवसेनेचं मोदी सरकारला मागणं

News Desk

महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक

News Desk

कुठल्या प्रश्नावर आंदोलनं करायची याचं भान भाजपच्या नेत्यांना राहिलेलं नाही !

News Desk