HW News Marathi
देश / विदेश

इंटरपोलचे माजी अध्यक्ष हॉंगवेई चौकशीसाठी चीनच्या ताब्यात

पॅरिस | गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे प्रमुख मेंग हॉंगवेई बेपत्ता आहेत. मेंग हॉंगवेई यांनी इंटरपोलच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. मेंग यांच्या राजीनाम्याची माहिती इंटरपोलनेच दिली आहे. यासोबतच मेंग हॉंगवेई यांना चीननेच ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे. मेंग हॉंगवेई यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले आहे, असे चीनने स्पष्ट केले आहे. मेंग हाँगवेई यांनी लाच घेतल्याचा तसेच इतर गुन्हेगारीविषयक कृत्यात सहभागी असल्याचा चीनचा आरोप आहे.

दुबईत १८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान इंटरपोलची बैठक होणार आहे. त्या बैठकीत नवीन इंटरपोलचा प्रमुख निवडला जाईल अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मेंग हॉंगवेई यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण कोरियाचे किंम जोंग यांग यांची इंटरपोलच्या कार्यकारी अध्यक्षपदी हंगामी निवड करण्यात आली आहे. हाँगवेईवरील लाच घेतल्याचा आरोपावरुन जगभरात खळबळ उडाली आहे.

फ्रान्सच्या कार्यालयातून बाहेर पडताना मेंग हाँगवेई बेपत्ता झाले होते. त्यांच्या अशा अचानक बेपत्ता होण्याने अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत होते. मात्र चीनने अखेर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. मेंग हाँगवेई यांनी लाच घेतल्याचा तसेच इतर गुन्हेगारीविषयक कृत्यात सहभागी असल्याचा चीनचा आरोप आहे. हाँगवेई हे काही दिवस गायब होते. नंतर चीन पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात दोन पोलीस शहीद

News Desk

काँग्रेसचे अल्पेश ठाकूर यांचा पैसे उडवितानाचा व्हिडिओ व्हायरल

News Desk

आता सरकारने मास्क, सॅनिटायझर्स रेशनच्या दुकानावर उपलब्ध करावेत !

News Desk
नवरात्रोत्सव २०१८

मुंबईत आदिशक्तीच्या आगमनाला सुरुवात 

News Desk

मुंबई । ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिल्यानंतर सर्व दूर आता चाहूल लागली ती आदिशक्तीच्या आगमन सोहळ्याची आणि आता नवरात्रोत्सवासाठी संपूर्ण मुंबईकर सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवाप्रमाणेच यंदा नवरात्रोत्सव मंडळेही सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अधिकाधिक भक्तांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब सध्या केला जात आहे. सामाजिक भान राखत नवरात्रौत्सव साजरा करणारी मंडळे ही मुंबईची खास ओळख आहे. अंबामातेच्या आगमनासाठी सर्व मुंबईकर सज्ज झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत नवरात्रोत्सवाची धूम ही काही उपनगरांची खास ओळख बनली आहे. त्यात कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, बोरीवली, विलेपार्ले, गोरेगाव, घाटकोपर, अंधेरी यांचा क्रम लागतो. नवरात्रोत्सवात गरबा खेळून मुंबईकर रात्र जागवतात. तर काही मंडळे ही गरब्यासाठी प्रसिद्ध आहेत. तिथे गरबा खेळायला जाण्यासाठीही अनेकांनी आधीपासून सेटिंग करुन ठेवलेली आहेत. तरुणांच्या बरोबरीनेच महिलाही गरबा खेळण्यासाठी अधिक इच्छुक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांत नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेण्ड सेट झाला आहे. त्यामुळे नसलेल्या रंगांच्या साडी, ड्रेसची खरेदीही महिलांनी उत्साहांनी केली आहे. यात पुरुषही मागे नाहीत. अनेकांनी त्या -त्या रंगाचे शर्ट खरेदी केले आहेत.

काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये पाद्यपूजन आणि आगमन सोहळ्यांची प्रथा सुरु झाली. हळूहळु या पाद्यपूजन आणि आगमन सोहळ्यांचे स्वरुप बदलून मोठ्या इव्हेंटमध्ये त्याचे रुपांतर होण्यास सुरुवात झाली. त्याचेच अनुकरण करत यंदा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनीही सुवर्णसंधी साधत जोरदार आगमन सोहळ्यांचे आयोजन केले आहे. तसेच, ठिकठिकाणी आदिमातेचे पाद्यपूजन सोहळेही रंगले. काही मंडळांनी विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी आधीच सुरू केली आहे.

पितृपक्षामुळे मंदावलेली बाजारपेठ पुन्हा फुलण्यास सुरुवात

आदिमाता दुर्गेचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे मुंबईच्या बाजारात लगबग दिसू लागली आहे. घराघरांत घटस्थापना करून देवीच्या नावाचा जागर करण्यासाठी व विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी भाविकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत आतापासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पितृपक्षामुळे मंदावलेली बाजारपेठ पुन्हा फुलण्यास सुरुवात झाली आहे.

पितृपक्षात भाजीबाजार सोडला तर अन्य क्षेत्रातील व्यवहार तसे थंडावलेलेच असतात. या काळात सामान्य नागरिक नवीन वस्तुंची सहसा खरेदी करीत नाहीत. मात्र, आता नवरात्रीच्या आगमनामुळे बाजारपेठ नव्याने बहरली आहे. नवरात्रोत्सव म्हणजे सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. घरोघरी घटस्थापना करुन विधीवत पूजन केले जाते. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या घटस्थापनेसाठी बाजारपेठेत गर्दी व्हायला लागली आहे.

Related posts

नवसाला पावणारी टेंभी नाक्याची देवी

Gauri Tilekar

‘ती’ने परिस्थितीवर मात करत, जगासमोर ठेवला नवा आदर्श

News Desk

नवरात्रोत्सवाची २९ वर्षांची अखंड परंपरा, चेतनाची माऊली

Gauri Tilekar